जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, April 23, 2009

खारीचे योगदान






आपण सगळेच जण कधी ना कधी प्लॅस्टिक बॉटल्ड वॉटर पीतोच . पाणी पिऊन झाले की रिकामी बाटली कचऱ्यात फेकून देतो. ह्या दोन्ही क्रिया इतक्या अंगवळणी पडल्यात की ह्यामागच्या संभाव्य धोक्यांची वस्तुस्थितीची कल्पना कानामागे टाकली जाते, दुर्लक्षिली जाते. माहीत असलेलेच पुन्हा वाचले गेले तर किमान काही दिवस तरी मन त्याचा पाठपुरावा नक्कीच करते, त्यासाठी हा प्रयत्न.

एका बॉटल्ड वॉटरची किंमत- साधारण $.५० म्हणजे नळाच्या पाण्यापेक्षा १९०० पट्टीने जास्त.
म्हणजे, आजच्या रिसेशन, महागाई च्या जमान्यात वर्षभरात बॉटल्ड वॉटर साठी केवढा तरी पैशाचा अपव्यय.

पाणी प्लॅस्टिकमध्ये ठेवल्यामुळे विषारी द्रव्ये शोषून घेते [Bisphenol-A(BPA)] ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.
ह्या बॉटल्सचे पॅकिंग, वाहतूक आणि शेवटी त्याची विल्हेवाट ह्या प्रक्रियेमुळे वातावरण खराब होते.

२००४ साली झालेल्या एका सर्वेक्षणानुसार एका वर्षात २६,०००,०००,००० लीटर पाणी म्हणजे २८,०००,०००,००० प्लॅस्टिक बॉटल्स. त्यातील ८६% बाटल्या कचऱ्यात फेकल्या जातात. म्हणजेच दर सेकंदाला १५०० बाटल्या कचऱ्यात.

२६,०००,०००,००० पाण्यासाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक बॉटल्स बनविण्याकरिता १७,०००,००० बॅरल्स तेल लागते. ह्या एवढ्या तेलावर ,००,००० गाड्या वर्षभर धावू शकतात. शिवाय ह्याच्या उत्पादनामुळे वातावरणात २५,००,००० टन्स कार्बन डायॉक्साईड सोडला जातो.

$
१००,०००,०००,००० म्हणजे १०० बिलीयन डॉलर्स इतके पैसे दरवर्षी प्लॅस्टिक बॉटल्स मुळे खर्च होतात. ह्यापुढे तर फेडरल बेलऑऊट पॅकेजही लहानच आहे.

आपण जर फक्त बॉटल्ड वॉटरच पीत असाल तर आपल्याला हे माहीत आहे का?
तुम्ही पैसे खर्च करता वातावरणात प्रदूषण वाढविण्यास मदत करता. जमिनीखाली असलेल्या पाणी धरून ठेवणाऱ्या खडकांचा थर प्रदूषित करता. ज्यामुळे विहिरीतून पाणी मिळण्याची प्रक्रिया कमी होते.

आता सोयीचे पडते म्हणून सगळेजण गाड्यांमध्ये ह्या प्लॅस्टिक वॉटर बॉटल्स ठेवतात. पण,
गाडीत असलेली उष्णता बॉटल्सचे प्लॅस्टिक ह्यामुळे तयार होणारी केमिकल्स आतले पाणी शोषून घेते. परिणाम ब्रेस्ट इतर प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात.

आता ह्या बॉटल्स आपल्यापर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळ्या तापमानातून प्रवास करतात. म्हणजे, गोडाउन मध्ये २५फॅ ते ८५फॅ, ट्रक्समधून प्रवास १००फॅ ते १५०फॅ, दुकानात माल उतरवणे-चढवणे ४५फॅ ते १००फॅ, दुकानात ५५फॅ ते १००फॅ शेवटी आपले घर-गाडी. म्हणजे आतील पाण्यावर किती दुष्परिणाम झाले ते पाहा.


दरवर्षी १४ बिलीयन पॉउंडस टायर्स, कार्डबोर्ड बॉक्सेस, प्लॅस्टिक कप्स, बॉटल्स, कॅन्स, शीटस इतर प्रचंड कचरा समुद्रात टाकला जातो. त्यातील काही समुद्राच्या तळाशी जातो तर काही मासे खातात. परंतु प्लास्टीकयुक्त कचरा पाण्यावरच तरंगत राहतो, मैलोनमैल प्रवास करतो. शेवटी कधीतरी कुठल्या कुठल्या किनाऱ्यावर फेकला जातो. प्लॅस्टिक हे कधीही नष्ट होत नाही. म्हणजे शेवटी नुकसान आपले सगळ्या प्राणिमात्राचे होते. अगदी अलास्काच्या रिमोट प्रदेशातही प्लॅस्टिक बॉटल्स सापडल्या आहेत.

प्लॅस्टिक बॉटल्ड वॉटर व्यतिरिक्त आपण कसेही पाणी प्यायलो तर आपली पृथ्वी आपले पाकीट हरेभरे ठेवायला खूपच मदत होईल. प्रत्येकाने लावलेला हातभार येणाऱ्या पिढीच्या भविष्यास काही अंशी कमी प्रदूषण निर्माण करेल. चला तर मग ह्याची अंमलबजावणी नक्की करून आपले खारीचे योगदान देऊयात.

[
अनेक उपयुक्त लेखांमधून वरील माहिती संकलित केलेली आहे. ]

2 comments:

  1. kanokani.com war tumachya blogchi link dili aahe
    http://kanokani.maayboli.com/upcoming/newest

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद अजय.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !