
गाडीने दादर स्टेशन सोडले तसे रडणाऱ्या मुलांचे रडणे एका क्षणात पळाले. पोरांनी खिडक्या गाठल्या. बहुतेक बऱ्याच मुलांना खात्री नसावी आपण ट्रीपला नक्की जाणार याची

अगदी तुरळक नावे मी भूगोलात नुकतीच ऐकल्याने ट्रीपवरून शाळेत परत गेल्यावर मला कशी बढाई मारता येईल व सगळ्या मैत्रिणी कश्या, " तुझी काय बाबा मज्जाच झाली. आम्हाला कोणी नेत नाही,
" असे म्हणतील आणि त्यावर मी अगदी आव आणून म्हणेन, " आहेच मुळी माझी मज्जा आणि आहेतच माझे आई-बाबा एकदम ग्रेट. त्यांना आवडते अशा सहलींना आम्हाला न्यायला. " आता काही गरज आहे हे बोलायची पण.....
, तर मी ही अशी दिवास्वप्ने पाहण्यात रममाण.


मामांनी दिलेल्या पत्रकात सहलीचा सविस्तर आढावा होताच. वाराणसी एक्सप्रेस तेव्हा दादरहून सुटत असे आता बहुदा लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटते. तर दादर - वाराणसी -काशी विश्वेश्वराचे मंदिर- अलाहाबाद-त्रिवेणी संगम-पाटणा-गया-बुद्धगया-सिलिगुडी-दार्जीलींग-सिलीगुडी-कलकत्ता-जग्गनाथपूरी- भूवनेश्वर- हैदराबाद-गोवळकोंडा आणि परत. असा ढोबळमानाने प्रवासाचा मार्ग होता. यात अनेक फाटे होतेच,


आगगाडीत खूपच मजा आली. एकतर पहिलाच दिवस होता. सगळ्यांनी घरून दोन वेळा पुरेल इतके ओले जेवण आणलेले होतेच. गप्पा-पत्ते, भेंड्या यांचा जोर होता. त्यात मध्ये मध्ये मामा माहिती देत होते. हे करा आणि हे करू नका - मुलांचा प्रश्नच नव्हता पण मोठेही अगदी कान देऊन ऐकत नव्हते. बराच वेळ झाली तरी प्रवास काही संपेना तशी सगळ्या मुलांची भुणभूण सुरू झाली, " आई, कधी उतरायचे आता?

इतक्या लांब प्रवासाने मुलेच काय पण मोठी माणसेही कंटाळलीच होती. शिवाय सगळे झोपले आणि कोणी सामान पळवले तर, या भीतीने बरेच जण जागेच होते. निघण्याआधीची धावपळ, तयारीची दगदग आणि आता हा प्रवास सगळे दमून गेलेले. अलाहाबाद जंक्शनला गाडी खूप वेळ थांबली होती बरीच मंडळी खाली उतरली, फलाटावर उगाच भटकली,
. आता फक्त एकच स्टेशन की उतरायचे त्यामुळे सगळे ताजेतवाने झाले. गाडी सुटली आणि रेघेकाकूंच्या लक्षात आले की पाण्याचा फिरकीचा तांब्या रिकामा झालाय. मग काकांना, " एवढे कसेहो कळत नाही, अर्धा तास टिवल्याबावल्या करत खाली उभे होतात पण पाणी काही आणले नाही." सगळ्यांसमोर ही झापतेय म्हटल्यावर काका वैतागले.
आणतो गं बाई पुढच्या स्टेशनवर.





अरे हो या ट्रीपमध्ये हॉटेलात फारसे आम्ही राहिल्याचे मला आठवत नाही. सगळीकडे धर्मशाळेतच जागा बुक केली होती. आता धर्मशाळा म्हणजे मध्ये एक मोठा चौक आणि चारी बाजूने खोल्या. एकदम हवेशीर, भरपूर उजेड. मुलांना उनाडायला भरपूर जागा. फक्त कॉमन बाथरुम आणि टॉयलेट्स. पण कोणालाही त्याचे दुःख झाल्याचे पाहिले नाही. कदाचित तो काळच वेगळा होता. (१९७३) आगगाडीतून उतरलो आणि धर्मशाळेत येऊन टेकलो. लागलीच पुन्हा एक सभा घेतली मामांनी. काशी विश्वनाथाच्या मंदिरात काय करू नका हे सांगितले. दमल्यामुळे त्यादिवशी जेऊन सगळे गाढ झोपले. सकाळी आंघोळी करून मंदिरात जायला निघालो.


शेट्येकाकू व गायतोंडे आजींनी मामांची सूचना धुडकावून लावली आणि पुजाऱ्यांच्या भुणभुणीला बळी पडल्या. म्हणे अभिषेकच करायचा तोही तिथे बसून. मग काय तीन तास आणि रु. पन्नासची फोडणी वर शिधासामुग्री. त्यावेळी पन्नास रूपये फार जास्ती होते. त्यांना तिथेच सोडून आम्ही बाकीचे लोक गेलो आजूबाजूचे पाहायला. संध्याकाळी कळले की दोघांना चांगलाच फटका बसला होता.


तोवर हे उतरलेले लोक जरा पाण्यात जास्तीच आत गेले. छातीपर्यंत पाणी होते. आणि एकदम कोणीतरी जोरात किंचाळले. आधी काही कळलेच नाही काय झाले कारण आजूबाजूला काही छोट्या छोट्या होड्याही होत्या. शेट्येकाकुंनि डुबकी मारली आणि वर आल्या तर एक अर्धे जळलेले प्रेत तरंगत होते. ते पाहून सगळ्यांची बोबडीच वळली. काकूंना इतका जोरदार धकका बसला की त्यांची शुद्धच गेली व त्या खाली पाण्यात जाऊ लागल्या. मग जी काय पळापळ झाली की बस्स. गर्भगळीत सगळे कसेबसे पाण्याबाहेर आले. कसली अंघोळ आणि कसले काय. काकूंना त्या दिवशी सडकून ताप भरला.

मामांनी सांगितले होते पाण्यात उतरू नका पण कोणी ऐकेल तर ना? त्यादिवशी दहा-बारा अशी अर्धवट जळलेली प्रेते आम्ही पाहिली. त्याआधी कधीही मी मुळी गेलेले माणूस पाहिलेच नव्हते त्यात हे असे भयंकर दृश्य पाहिल्याचा फार फार त्रास झाला. पुढे बरेच दिवस झोपेतून घाबरून उठत असे. त्यानंतर मी पुन्हा अलाहाबादला गेले नाही पण आता हे प्रकार कधीचेच बंद झाल्याचे ऐकले आहे. संपूर्ण दहन झाल्यावर थोडीशी रक्षा फक्त संगमात सोडतात. आशा आहे असेच होत असेल.
फोटो जालावरून.
क्रमश:
असे प्रकार तिथे अजूनही घडतात म्हणे! खरं खोटं तिथे रहाणारे आणि देवच जाणो. भाग १ व भाग २ दोन्ही सुंदर! तुमच्या ब्लॉगवर जो गोब-या गालांचा बाळकृष्ण आहे त्याचंच नाव शोमू का?
ReplyDeleteगंगेमधल्या त्या डेड बॉडिज कधी अर्धवट जळलेल्या खुपच भितीदायक असतात. मला पण खुप अनिझी व्हायचं . गंगेमधे मी कधिच आंघोळ केली नाही..
ReplyDeleteलहानपणचा प्रवास.. मस्त विषय घेतलाय. पुढचा भाग लवकर पोस्ट करा.. उत्कंठा ताणु नये उगिच.. :)
कांचन अरे बापरे!मला वाटले की आता हे सगळे बंद झालेय. अलाहाबाद कोर्टात यावर काही केसेस पूर्वी चालू होत्या यावर बंदी घालावी यासाठी.
ReplyDeleteहो गं,त्या बाळकृष्णाचे नावच शोमू आहे.:) प्रतिक्रियेबद्दल आभार.
महेंद्र, आजही कधी मी एकटी असले ना की अचानक ते दृष्य डोळ्यासमोर येते रे.ती भिती अजूनही गेली नाही.आम्ही पण नाही कधी आंघोळ केली गंगेत.तिर्थही नाही घेतले.
ReplyDeleteटाकतेय पुढचा भाग,:)