

अलाहाबाद फोर्ट
शेट्येकाकूंना ताप भरल्याने त्यांना व काकांना न घेता आम्ही बाकीच्या मंडळींनी अलाहाबादमधील काही गोष्टी पाहिल्या. अगदी बारीक सारीक तपशील तर मला फारसा काही आठवत नाही. अलाहाबादचा किल्ला चांगलाच लक्षात राहिला. यमुनेच्या उत्तर तिरावर १५८३ दरम्यान अकबराने हा किल्ला स्वतःच्या देखरेखेखाली बांधवून घेतला होता. या किल्ल्याच्या बाहेरील दगडी भिंती किंवा तटबंदी म्हणूयात अवाढव्य आहे व अतिशय प्रशस्त किल्ला आहे.



प्रसिद्ध सरस्वती कुंडही इथेच आहे. या कुंडात सरस्वती नदीतून पाणी येते असे काही म्हणतात तर काहींचे म्हणणे हे असत्य आहे. झाले यावरून लेलेकाका व नाईककाकूंचे जुंपले. दोघेही इतिहासाचे शिक्षक. कोणीच माघार घेईना. शेवटी शाळेत गेल्या गेल्या इतिहास खणून काढतोच आणि पुरावाच टाकतो तुमच्या समोर असे म्हणत लेलेकाका तरातरा निघून दुसऱ्या टोकाला असलेल्या एका महालात गायब झाले.


आजही मला उगाचच त्या आनंदभवनचा राग येतो.

आता शेट्येकाकूंना बरे वाटू लागेल होते. मग मामा म्हणाले आज पाटणा गाठूया. गरम गरम सांजा व आल्याचा चहा घेऊन आपापली बोचकी सांभाळत सगळ्यांची वरात सिटी स्टेशनवर पोचली. आमचे बुकींग बहुतेक आदल्या दिवशीचे असणार कारण जेव्हां गाडी आली तेव्हा कोणाचा पायपोस कोणाला नाही अशी अवस्था झाली. मामांनी सांगितले होते की काहीही झाले तरी सगळे गाडीत चढा. ज्या मिळेल त्या डब्यात चढा मग एकदा गाडी सुटली की पाहू. त्याप्रमाणे अर्धे लोक जीजान लगाके नेहमीच्या लोकलच्या सवयीने चढले. आम्ही व अधिकारी मंडळी एकत्रच होतो. हुडकत हुडकत मामा आले तेव्हा कळले की एकूण चार फॅमिलीज चढल्याच नाहीत.

पाटणा-पाटलीपुत्र नावाने ओळखले जाते. मगधाची राजधानी. नुकतेच मी वाचले होते. शिवाय नालंदा विद्यापीठ इथेच असल्याने मला जरा जास्तच आपुलकी वाटत होती. गुरूकल पद्धतीबद्दल बरेच काही एकले होते. प्रवास सुरवातीला त्रासदायक झाला खरा पण मग नेहमीप्रमाणे जेव्हां आम्ही चढत होतो तेव्हा आम्हाला अडवणारी मंडळी एकदा का आम्ही त्यांच्या कळपातले झालो म्हटल्यावर एकदम सामंज्यसाने वागू लागली. नंतर पुढच्या प्रत्येक पुढच्या स्टेशनावर आम्ही त्यांच्यातले झाल्याने लोकांना अडवू लागलो. कशी गंमत असते नाही.

एकदाचे पाटण्याला पोचलो. इथेची धर्मशाळाच होती. पण इथे वेगवेगळ्या खोल्या नव्हत्या. एकच भली मोठी खोली होती. त्यात आम्ही पोचलेले सगळे दहा/बारा चौकोनात लक्ष्मूण रेखा आखल्यासारखे आपापल्या चौकटीत सामान टाकून पसरलो. अजून मागे राहिलेले लोक आलेच नव्हते. मामांचा जीव खालीवर झालेला. उलटे परत जाऊ शकत नाही त्यामुळे वाट पाहणे बस. शेवटी एकदाची सगळी मंडळी येऊन पोचली आणि एकदम गदारोळ माजला. जोतो काहीतरी बोलत होता. कोणाचे कोणाला ऐकू येईना. आम्ही सगळी मुले एका भिंतीशी रांग करून टेकून बसून सगळी गंमत पाहत होतो. अर्धातास ही धुमश्चक्री झाल्यावर सगळे थकले आणि गप्प बसले. आपलेच दात आणि आपलेच ओठ त्यामुळे मामांना कोणालाही काही बोलताही येईना. शेट्येकाकू आजारी पडल्या त्याला मामा थोडेच ना जबाबदार होते पण हे कोणी ध्यानात घेईचना. बिचारे मामा. 



फोटो जालावरून
क्रमश:
लय भारी....चार फ्यामिलीज राहिल्या.....वाचतांना तुझ्याबरोबर फिरत असल्यासारखे वाटतेय.....लिही गं पुढचे पटापट...
ReplyDeletechhanach chaalali aahe lahanapanechee sahal. itakya divasaanche sahal mhanaje parvaneech vaatalee asel natemvhaa!
ReplyDeleteवाचतो आहे.प्रवासवर्णने हा तसा मनोरंजक प्रकार. आणि हे लेखनही फार मजेच चालले आहे. असेंच चालू दे. माझ्या मुशाफिरीचे रेकॉर्ड मोडावे ही शुभेच्छा.
ReplyDeleteतन्वी अगं इतके लोक खाली राहीलेत म्हटल्यावर मामांचे धाबेच दणाणले गं. आले बाई शेवटी धडपडत. हेहे.
ReplyDeleteगौरी अनेक धन्यवाद. हो ना त्याआधी मुंबई-गोवा हा चोवीस तासांचा बोटीचा प्रवास हेच काय ते अनुभवलेले.खूपच मजा आली:)
ReplyDeleteअरुणदादा अरे मी आपले जेवढे आठवेल तसे लिहीण्याचा प्रयत्न करतेय.तशी लहानच होते ना तेव्हां:)बाकी आहे खरा मनोरंजक प्रकार.आशा आहे तसेच वाटत असेल.
ReplyDelete