सगळी बाबाकंपनी तिथेच पत्ते खेळत होती. त्यांच्या आरडाओरड्याचा आवाज अगदी गेस्टहॉऊसच्या गेट पर्यंत येत होता. आम्ही मुले लागलीच आपापल्या बाबांच्या खांद्यावर, मांडीवर रेललो आणि मला मला करत त्यांच्या हातातले पत्ते ओढायला लागलो. अगदी लहान होती ती तर बाबाचे तोंड सारखी स्वतःकडे वळवून बोबडे बोलत बाजारात पाहिलेली खेळणी, फुगे कशी मस्त होती आणि आईने घेऊन दिली नाहीत हे गाल फुगवून फुगवून सांगत होती. तोवर आयाही पोचल्याच होत्या. मग काय काय खरेदी केली व किती स्वस्त मिळवले याच्या बढाया सुरू झाल्या.
एकीकडे गेस्टहॉऊसवाल्याने जेवणाची मांडामांड झाल्याची वर्दी दिली आणि आया आपापल्या कारट्यांना पकडून भरवायला बसल्या. बाबालोकही गरम गरम खाऊन घ्या ही बायकोची आज्ञा कधी नव्हे ते शिरसावंद्य मानून पानावर आले. मग सगळेजण जेवणात रंगून गेले. 


पोटोबा अगदी तृप्त झाल्यावर नाईककाकूंनी हळूच विचारले, " अहो, आजींची तब्येत कशी आहे आता? ताप उतरला का? नाही म्हणजे ’ गायबुवा-बाई ’ कोणाचेच तोंड दिसत नाहीये ना खाली. " गायबुवा-बाई म्हटल्यावर मोठे काय आम्ही मुलेही खोखो हसलो. काका-काकू असे कसे दिसतील या कल्पनेनेच..... लहान मुलेही संसर्ग झाल्यासारखी काही न कळूनही हसत होती. तेवढ्यात जिन्यावरून काका-काकू उतरून आले. त्यांना पाहताच काळ्यांची जेमतेम दोन वर्षांची गौरी टाळ्या वाजवत म्हणाली, " गायबुवा - बाईंचे तोंड आले, आले. गायबुवा कुक


मामा व लेलेकाका गेले तसे जेवण उरकून सगळे आपापल्या खोलीत सामान आवरू लागले. बाबा व बच्चेकंपनी लोळली व लोळता लोळता रजया ओढून झोपून गेली. मध्ये किती वेळ गेला कोण जाणे एकदम जाग आली ती आईच्या आवाजाने. " अगं ऊठ गं, अहो तुम्हीही उठा. मामा आलेत तिकिटे घेऊन. पण काहीतरी घोळ दिसतोय हो. त्यांनी खाली डायनिंग हॉलमध्ये बोलावलेय सगळ्यांना. चला चला. " मी ऐकले न एकलेसे करून पुन्हा गाढ झोपून टाकलं. भाऊही झोपलेलाच होता.
सगळी मोठी माणसे हॉलमध्ये जमा झाली. संध्याकाळी आठची ट्रेन होती पण सिलीगुडी ते कलकत्ता ६०० किमी अंतर असले तरी एकही डायरेक्ट ट्रेन नाही. ट्रेनने जाऊ शकतो मात्र बरीच बदलाबदली करून एकूण तीन दिवस घेऊन पोचता येते. तेव्हा ते शक्यच नव्हते. एकतर आधीच टाईमटेबल कोलमडले होते. सवाल होता तो गायतोंडे आजींना बसचा प्रवास झेपेल का नाही? जवळ जवळ बारा/चौदा तासांचा बसचा प्रवास एकंदरीत कुणालाच झेपण्यासारखा नसला तरी नाइलाज होता. म्हणून बसचीच तिकिटे आणली होती. " शिंचे टाका झोपून मस्तपैकी आठ-दहा तास. जरा जागे व्हाल तोवर येतंय की कोलकाता. " इति लेलेकाका. मला काही कळले नाही परंतु कुठलीही ट्रेन डायरेक्ट जाणारी नसल्याने बसने जायचेय एवढेच कळले.

दुर्गापूजा


चमचम 
फुलबाजार

कोलकत्त्याला मामांनी बरोबर दुर्गापूजेचे दिवस असतील असेच प्लॅनिंग केले होते. मूळ बेतानुसार आम्ही येथे सहा दिवस राहणार होतो. परंतु शेट्येकाकू, गोखलेकाकू व गायतोंडे आजींच्यामुळे एकूण पाच दिवस फुकट गेले होते. त्यामुळे आता कोलकत्त्यात तीन/साडेतीन दिवसच राहायला मिळणार होते. पश्चिम बंगालची राजधानी - कोलकाता प्रचंड मोठे शहर असून ढोबळमानाने उत्तर-दक्षिण व मध्यभागात विभागले गेलेय. वेळ कमी व अनेक ठिकाणे. त्यात दुर्गापूजेचे शेवटचे चार दिवस असल्याने जिकडे तिकडे प्रचंड गर्दी होती. मोठ्या मोठ्या देवीच्या मूर्ती व देखावे, त्यापेक्षा मोठे तंबू, दर्शनासाठी रांगा व संपूर्ण रात्रभर देवी पाहत फिरणारे लोक. दिवाळीपेक्षा मोठा उत्सव आहे हा तिथला. जागोजागी लाऊडस्पीकर, मोठ्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या. फुलांच्या राशी व गोलगप्पे, चाट व बेंगॉली मिठाईचे ठेले. प्रचंड चहलपहल होती.


बसच्या प्रवासाने सगळे खरे तर थकले होते पण दिवस फुकट घालवून चालणार नव्हते. त्यामुळे तासाभरात फ्रेश होऊन तयार व्हा म्हणजे आपण लागलीच निघू. हुगळी नदीवरील हावडा पूल प्रत्येकालाच पाहायचा होता. हावरा पूल १९३७ ते १९४३ या दरम्यान बांधला गेलाय. हुगळी नदीवर एकूण चार पूल असून जून १९६५ मध्ये याचे नाव बदलून रवींद्र सेतू असे ठेवण्यात आले. रविंद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळाल्यावर त्यांचे नांव या पुलाला दिले गेले. तरीही अजूनही हावडा पूल म्हणूनच हा प्रसिद्ध आहे. इतर तीन पूल म्हणजे विद्यासागर सेतू, विवेकानंद सेतू व नवीनच बांधलेला निवेदिता सेतू. हावडा ब्रिज हा ७०५ मीटर लांब असून ९७ फूट रुंद आहे. संपूर्णपणे स्टीलने बांधून काढलेल्या ह्या ब्रिजवरून दररोज लाखात गाड्या व त्यापेक्षा दहापटीने जास्त लोक प्रवास करतात. आम्ही बराच वेळ इथे थांबलो.




कॊटन कलकत्ता सिल्क कलकत्ता कॊटन कलकत्ता


सिल्क कांथा हॆंड वर्क बेंगॊल सिल्क
मग चौरंगी नावाने प्रसिद्ध बाजारात गेलो. सगळे महिलामंडळ साड्यांच्या दुकानात घुसत होते
. पाहावे तिकडे सुंदर साड्या, पांढऱ्या व लाल टिपीकल बेंगॉली बांगड्या व अनेक सिल्कचे कुडते, धोती वगैरे पाहीले. थोडावेळ साड्या पाहताना मजा आली खरी पण आई-काकूंचे आटपेनाच मग बाबा व बच्चेकंपनी, तुम्ही या तुमचे आटपेल तश्या आम्ही पुढे होतो असे म्हणून धर्मशाळेत परतली. इतर काहीही त्यादिवशी पाहण्याचे त्राण नव्हते येऊन जेवलो व जवळपासच्या देवी-रोषणाई पाहायला गेलो. मध्यरात्री कधीतरी परत येऊन झोपलो.





फोटो जालावरून
क्रमश:
कलकत्ता माझं आवडतं शहर. इथे मी जवळपास दिड वर्ष होतो. इथेच राहुन आसाम, सिक्कीम वगैरे भागाला कामानिमित्य भेट दिली होती. इथलं महाराष्ट्र मंडळ ( हाजरा रोडचं) खुपच सुंदर आहे. मी तिथे बरेच दिवस राहिलो आहे. एकदा तर चक्क दिवाळी करता पण तिथेच होतो. त्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नाना पासुन तर फराळ, आणि नंतर सुग्रास जेवण, सगळी व्यवस्था केलेली होती त्यांनी. छान आहेत आठवणी.. :)
ReplyDeleteचमचम चा फोटो बघुन तोंडाला पाणि सुटलं. माझी अतिशय आवडती मिठाई... माझं आजोळ बनारस चं आणि आईचं कलकत्त्याचं त्यामुळे जन्मापासुनच बंगाली मिठाई खात मोठी झाले. बरिच वर्षे झाली आता चमचम खाऊन. तुमच्या ह्या पोस्ट मुळे सगळ्या आठवणिंना उजाळा मिळाला. अनेक आभार. :)
ReplyDeleteमहेंद्र, आमच्या मामांना या महाराष्ट्र मंडळाबद्दल माहीत नसावे किंवा तेव्हां ती नसतील नाहीतर आमची ही मस्त सोय झाली असती.:) अर्थात कलकत्त्यात खाण्यापिण्याची चंगळ झालीच.
ReplyDeleteरोहिणी, आजोळ बनारसचं आणि आईचं कलकत्ता म्हणजे काय बाबा साड्यांची व खास खास दागिन्यांची रेलचेलच की.:D एकदा का चमचमची चव चाखली की अर्धा बॊउल खल्लास आणि मग आपणही खल्लास. हाहा...मस्त.
ReplyDelete