जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, March 31, 2009

लिखे जो खत तुझे ....

आज सकाळी सकाळी शशीकपूर-आशा पारेख- "कन्यादान " मधील हे मधुर गाणे एकले,

लिखे जो खत तुझे, वो तेरी याद मे
हजारो रंग के, नजारे बन गयें
सवेरा जब हुआं, तो फूल बन गयें
जो रात आयी तो, सितारे बन गयें

अप्रतिम कल्पना. शब्द साधे सहज तरीही भाव हृदयाला हात घालणारे. मन प्रफुल्लित होऊन गेले. नीरज यांचे सुंदर शब्द व रफीचा मनात उतरत जाणारा स्वर.शंकर-जयकिशनचे संगीत. यांचा मिलाप म्हणजे हे मधुर गाणे. तल्लीन होऊन ऐकत राहावे. ह्या झिरपत जाणाऱ्या स्वरांची जादू काळाच्या ओघात हरवलेल्या अन व्यवहाराच्या धबडक्यात आतल्या मनात कुठेतरी खोलवर गाडलेल्या अलवार प्रेमाची याद देईल. तितक्याच हळुवारपणे त्याला मनसोक्त पसरू द्या. पुन्हा एकदा त्या प्रेममय आठवणीचा उत्सव मनभर साजरा होईल. जपलेले क्षण कुरवाळून पुन्हा कुलूपबंद करून ठेवा कारण ही अशीच सुंदर सकाळ अन अशी अप्रतिम गाणी जेव्हांजेव्हा कानावर पडतील तेव्हातेव्हा ही आठवणीची जपमाळ ओढायलाच हवी, खरे ना?

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !